१३ जुलैच्या मुंबई हल्ल्याने दुख झालं...पण आता सवय झाली आहे...कष्ट करून जगण्याची आणि जगताना प्रत्येक क्षणी मारण्याची....मेले नाहीत तरी मरण्याची टांगती तलवार डोक्यावर असतेच...पण थांबणे आपल्या लोकांमध्ये नाही हेच खरे.......
हल्ला आहे झाला
हल्ला आहे झाला
कळते हे जेव्हा,
तळपायाची आग
मस्तकात जाते तेव्हा.
भीती नाही वाटत
आता ह्या हल्ल्यांची,
सवय आहे आता
भडकून उठतात मन
आमची ह्या हल्ल्यांनी,
भडकीमध्ये तेल ओतण्याचे काम
होते नेत्यांच्या आश्वासनांनी.
नेते म्हणतात....
"सगळ्यांनी शांत राहा
अफवांवर ठेवू नका विश्वास",
नुसतं बोलून काय फायदा
कामं करा कुठलीतरी खास.
लोकांच्या स्पिरिटला करून सलाम
नेते होतात बाजूला,
लोकच असतात याक्षणी
एकमेकांच्या मदतीला.
गरजतो सारा आसमंत
मृतांच्या किंकाळ्यांनी,
एकाच प्रश्न विचारतात ते
"गुन्हा काय केला आम्ही सगळ्यांनी?"
अशा प्रश्नांना कधी
उत्तरे नसतात मिळत,
ह्याच उत्तरांच्या शोधात
राहतात कित्येक आत्मे जळत.
संपले सगळे आज
वाटत असले जरी,
हुर-हुर असतेच मनात
जाताना आपल्या घरी.
तरी उठणार मी परत
प्रत्येक वेळेस पडल्यावर,
करणार मात साग्ल्यान्समावेत
अतिरेक्यांच्या हल्ल्यांवर!!!!
--Kavi Rahul.



